एका कार्यक्रमाला आचार्य अत्रे हजर होते. त्यांच्या अगोदरचे सनातनी गृहस्थ आपल्या भाषणात म्हणाले,"आम्ही शेंडी का ठेवतो, त्याला शास्त्रीय कारण आहे. आमच्या पुर्वजांना माहीत होते की शेंडीत विज असते."
त्यांच्यानंतर आचार्य अत्रे बोलायला उभे राहिले व म्हणाले,"शेंडीत विज असते हे कदाचित कुणाला माहीत नसेल. पण मला तसा अनुभव आलाय. मी कॉलेजला गेल्यावर शेंडी काढली आणि माझ्या वडिलांना चांगलाच धक्का बसला !"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा